यंदाना वरीसमा आमनाकडे कांदास्नी कया वांधा




धुळे / गणेश जैन, खबरबात
साक्री तालुक्यातील बळसाणे , दुसाणे , इंदवे , हाट्टी , ऐचाळे , म्हसाळे , लोणखेडी , घानेगाव , कढरे , सतमाने , छावडी , अमोदे, आगरपाडा , परसुळे , कर्ले , देवी व माळमाथा परिसर सांगितल्यावर कांदा उत्पादनाचे माहेर घर माळमाथा परिसरात कांदा उत्पादनाच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर असून वर्षाकाली साधारण पणे १८०० ते २००० ट्रक कांद्याचा भरून या भागातून पाठविला जातो.

यंदा सुरुवातीपासून पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले पुर्ण पावसाळ्यात या परिसरात असा एक ही जोरदार पाऊस झाला नाही यामुळे नद्या , नाल्यांना पूर आला नाही व शेतातील वहिरींच्या जलपातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही याकारणाने शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात कांदा लागवड करता आली नाही विहीरीत आहे तेवढ्या पाण्यावर शेतकऱ्यांनी अथांग प्रयत्नाने कांदा लागवड केली त्यातच पावसाने नुकसान केले

शेतकऱ्यांनी दिवस रात्र करून कांद्याला जगविले परंतु कांद्याला हमीभाव मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे कांदा खंडणी नंतर काय भाव मिळेल याचा भरवसा नाही कांद्याला एकरी खर्च जर पाहिले तर ४० ते ५० हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना येत असतो वाढलेले भाव मजूर दर वाढ अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांना मोठा खर्च येत असल्याने शेतकऱ्यांना सध्या १५० ते ८०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने खर्चच्या मानाने शेतकऱ्यांना कांदा पिक पुरवडत नसल्याचे शेतकऱ्याकडून सांगितले जाते आहे

शासनाने कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे या परिसरात शेतकऱ्यांची अर्थिक घडामोडी कांदा या पिकावरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांची सर्वच अर्थिक गणित बिघडलेली आहेत याकारणाने माळमाथा चा शेतकरी मोठ्या कौतुकाने म्हणतात कांदास्नी यंदा भी करात वांदा कसा काय लावो दर वरीसले कांदा अशी भावना शेतकऱ्यांच्या मुखातून उमटत आहे

 
कांद्याला शासनाकडून किमान १५०० रुपयांचा वर हमीभाव मिळणे गरजेचे आहे तरच शेतकरी वर्गाला कांदा पीक पुरवडणार आहे सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे दर गडगडल्याने ऐन दुष्काळी कालावधीत बळसाणेसह माळमाथ्याचा शेतकरी वर्ग अर्थिक अडचणीत सापडला आहे
  वेडू उत्तम खांडेकर
    शेतकरी ( बळसाणे )झ