चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट


चंद्रपूर महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चंद्रपूर - वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषतः चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याचीसंभावना आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेने होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वतःचे संरक्षणकरण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

गेल्या वर्षीचा म्हणजे २०१८ चा उन्हाळा हा १९०१ पासूनचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र २०१९ हा उच्चांकमोडत आहे. मध्य भारतातल्या बहुतेक सर्वच नगरांमध्ये यंदा उन्हाळ्यात किमान सरासरी 0.5 अंशांनी अधिक तापमान असेल, असा अंदाज भारतीयहवामान विभागानं व्यक्त केला आहे.

उष्णतेचे दुष्परिणाम व उष्माघातापासून नागरिकांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर मनपातर्फे 'हीट ऍक्शन प्लॅन' (उष्माघात कृती आराखडा) मार्चमहिन्यापासूनच राबविण्यास सुरवात केली आहे. यात उष्माघात प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत असून, विविध स्वयंसेवी संस्था व चिल्डवॉटर असोसिएशनतर्फे पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईची जागोजागी उपलब्धता करणे, सार्वजनिक बगीचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ करणे, मनपाआरोग्य केंद्रांद्वारे उष्माघात रुग्णांवर औषधोपचार सुविधा, जिल्हा सार्वजनिक रुग्णालयात शीत खोली(कोल्ड वॉर्ड) स्थापना, १०८ रुग्णवाहिकेचासहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल इत्यादी उपाययोजना राबविल्या जात आहेत.

वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरीरावर तसेच सृष्टीतील इतर जीवजंतूंवर दुष्परीणाम होतात. उष्णतेशी निगडित आजारपण व मृत्यू टाळता येणेशक्य आहे, तरी दरवर्षी अनेक लोक उष्णतेच्या दुष्परिणामांना बळी पडतात. वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात अधिकजाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या आहेत. 'उष्णतेची लाट ' ही एक नैसर्गिक आपत्ती असल्याने त्याबाबतीतआपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

सध्यातरी चंद्रपूर शहरात उष्माघाताचा बळी पडल्याच्या एकही रुग्णाची नोंद झालेली नाही. मात्र वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काहीदिवसात असणाऱ्या संभाव्य उष्णतेच्या लाटेपासून सर्वांनी स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परीणामटाळण्यास भरपूर पाणी प्यावे-तहान लागली नसेल तरी, थंड (गार) पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी, थंड पेये - ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणीप्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, कापडाने डोके झाकावे, थंड जागेत, वातावरणात राहावेतसेच भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रियायांची विशेष काळजी घ्यावी.

उष्माघाताची लक्षणे - अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळणे ही लक्षणे आढळल्यास थंडगार पाण्यानेअंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते), थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करूनये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा. तसेच १०८ या टोल फ्रीदूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आकस्मिक आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.