सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यानी केली आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा (घा)


 सततच्या नापिकीमुळे व कर्ज बजारीपणामुळे सावळी खुर्द येथील विश्वास चंद्रभानजी कडवे वय ५१ वर्ष या शेतकऱ्याने आज दि.२७/११/१८ रोजी दुपारी १:३० वा त्याच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 
      पोलिसांना घटनेची माहिती मिळता पंचनामा करून मृतकाचे प्रेत आरोग्य तपासणी करीता कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. 
         मृतकाचे मागे पत्नी,मुलगा,मुलगी,आई,वडील असा परिवार आहे. त्यांच्याकडे ३ एकर शेती आहे. कर्ज ७०हजार आहे असे वृत्त आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.