NSS शिबिर म्हणजे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र

www.khabarbat.com

www.khabarbat.com

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात  अनिल दबडे यांचे प्रतिपादन

मायणीः ता. खटाव जि. सातारा(सतीश डोंगरे)

  "राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र आहे. या शिबिरांमधून प्रेरणा व बळ घेऊन समाजकार्य करणारे कार्यकर्ते घडतात. तरुणांना समाजकार्याची नवी दिशा मिळते, " असे प्रतिपादन  जयभवानी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल दबडे यांनी केले. ते कला, वाणिज्य महाविद्यालय च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच श्री. भास्कर खरात हे होते. यावेळी पोलीस पाटील सचिन शेटे,  प्राचार्य डॉ सयाजीराव मोकाशी,श्री यशवंत माळी, श्री राजू रसाळ, श्री अलीभाई तांबोळी (स्वच्छता दूत), सत्यजीत साळुंखे, श्री दीपक नामदे, श्री विठ्ठल पाटील, नदीम शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते


कार्यक्रमाच्या प्रारंभी रासेयो प्रकल्पाधिकारी डॉ. उत्तम टेंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस पाटील सचिन शेटे यांनी ग्रामस्थांच्यावतीने संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. श्री विठ्ठल पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या जुन्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर माळी यांनी केले. ग्रामस्थ, प्राध्यापक वृंद याची मोठी उपस्थिती होती.