अखेर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले !.. या जिल्ह्याचे असतील पालकमंत्री हे .....




अखेर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले ! या जिल्ह्याचे हे असतील पालकमंत्री हे.....

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-महाराष्ट्र राज्यात शिंदे सह भारतीय जनता पार्टीचे नवे सरकार स्थापन झाले खरे, पण जवळपास तीन महिने होत आले तरी पालकमंत्रीपदाची नेमणूक करण्यात आली नव्हती. अखेर राज्य सरकारला मुहूर्त सापडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्याची पालक मंत्री मनून जबाबदारी दिली आहे.
गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद देण्यात आले असून गिरीश महाजन यांची धुळे, लातूर, नांदेडवर बोळवण करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे -

राधाकृष्ण विखे पाटील- नगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर, गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील - पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन - धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड - यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे - सांगली,
संदिपान भुमरे - छत्रपती संभाजीनगर
उदय सामंत - रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत - परभणी, धाराशिव
रवींद्र चव्हाण - पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर - मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे - जालना, बीड,
शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर