महापालिकेच्या अमृत जल योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा ईडीकडून चौकशीची मागणी, राकापा शहर उपाध्यक्ष देवतळेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन




महापालिकेच्या अमृत जल योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा
ईडीकडून चौकशीची मागणी, राकापा शहर उपाध्यक्ष देवतळे चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमृत योजना अपुरी, तरी नळाच्या पाण्याचे दर नागरिकाच्या माती !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर.
चंद्रपूर शहरातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी 2017 मध्ये केंद्र, राज्य व महानगर पालिका चंद्रपूर द्वारा शुरू केल्या गेलेल्या अमृत जल योजनेचे काम आजतागायत रखडले असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचा मोठा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या योजनेची ईडी विभाग मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदना द्वारे केली आहे.
पहिली अमृत जल योजना 2017 मध्ये लागू करण्यात आली. त्याची एकूण रक्कम 234 कोटी रुपये होती आणि या योजनेचे काम 2019 मध्ये पूर्ण होणार होते. मात्र ते काम पूर्ण झाले नाही. त्यासाठी महापालिकेने संबंधित ठेकेदाराला एक वर्षाची मुदत वाढवून दिली. मात्र आता सात वर्षे होऊनही ही योजना लागू झालेली नाही. काम अपूर्ण असतानाही महापालिकेने 200 कोटी रुपये संबंधित ठेकेदाराला दिले. या अपूर्ण अमृत जल योजनेसाठी पुन्हा 250 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र शहरात अमृत जल योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.



अमृत योजना अपूर्ण, तरीही नळाच्या पाण्याचे टॅक्स नागरिकाच्या माती!

मनपा ने अमृत योजनेच्या नळाचे बिल नागरिकाच्या माती वेगवेगळ्या दराच्या स्वरूपात आकारणी सुरू केली आहे.
एका खाजगी कंपनीकडून वेगवेगळ्या युनिटच्या दराने पाण्याचे दर वसूल करण्याचे टॅक्स नागरिकाच्या माती मारल्या जात आहे. नागरिकांना वापरलेल्या युनिट द्वारे त्याचे भरणा करायचा आहे. परंतु शहरात अजूनही अमृत योजना पूर्णत्वास गेली नाही. अनेक ठिकाणी नळांना मीटर लावण्यात आले नाही. बेवारस पाणी वाहत असते. नियमानुसार या योजनेचे पाणी नागरिकांना 24 तास नळाद्वारे देण्याचे अनिवार्य असताना. ते एक दिवसा आड कधी कधी तर चार चार दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यातही त्यांना अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तास पाण्याचा पुरवठा केला जातो. मग अशा परिस्थितीत ग्राहकांनी कर भरपाई युनिट द्वारे का करावी?
योजना अजूनही शहरात पूर्ण झालेली नाही. अनेक भागात अजूनही नागरिकांना अमृत योजनेचे पाणी मिळत नाही. पण मात्र या योजनेमुळे अधिकारांचे चांगभले झाले असे म्हटले तर वावगे होणार नाही.

त्यामुळे या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या योजनेची ईडी विभागा मार्फत गंभीर चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सोबत याची प्रतिलिपी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व ई.डी. कार्यालय नागपुर ला पाठविणयात आली। निवेदन देतांना शिल्पा कांबळे, विनोद लबणे, परब गिरडकर, विकी दळणे, वसंत पवार अन्य उपस्थित होते.