राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा संभ्रम कुलगुरूंनी दूर करावा !

  •  दिल्लीत राष्ट्रसं तुकडोजी साहित्य संमेलन राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासनाने घ्यावे 
  •  विविध अभ्यासक्रमात एक पेपर राष्ट्रसंतांच्या जीवन कार्यावर असावा

नागपूर- विद्यापीठाने त्वरीत करून यु . जी . सी . अनुदान आयोगाकडून रीतसर मान्यता घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी विचार धारेला आर्थिक बळ प्राप्त व्हावे , तसेच विद्यापीठालअंतर्गत चालणा - या विविध अभ्यासक्रमात एक पेपर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन कायांवर असावा तसेच राष्ट्रस तुकडोजी महाराजांच्या पन्नासाव्या सुवर्ण पुण्यस्मृती निमित्त दिल्ली येथे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन विद्यापीठाने आयोजित करावे , अशी मागणी श्री गुरूदेव युवा मंचाचे प्रवर्तक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा सदस्य ज्ञानेश्वरदादा रक्षक यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून केली आहे .

 २००५ मध्ये नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठ ' हे नामविस्तार होऊन विद्यापीठाला एक वैचारिक प्रतिष्ठा मिळाली . कोहचाडे विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाला हिणवणे थांबले . नामविस्तारानंतरचे प्रथम कुलगुरू डॉ . एस . एन . पठान यांच्या प्रयत्नाने तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील विद्यापीठाने घेतलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी कार्यक्रमात उपस्थित झाल्या . तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते . | कुलगुरू पठाणांनी महाराष्ट्र शासनाकडे राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासन निर्माण करण्यासाठी अनुदानाची मागणी केली . कुठलाही आढावेदान घेता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन कोटी रूपये अनुदान तुकडोजी अध्यासनासाठी दिले . तसेच पठान यांच्या प्रयत्नाने विद्यापीठाला ' या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ' हे विद्यापीठ गीत मिळाले . नागपूर विद्यापीठाचे नामकरण राष्ट्रसंत तुकडोजीच्या नावाने होण्याआधीपासूनच कुलगुरू अरूण सातपुतळे असतांना तुकारामदादा गीताचार्य ज्येष्ठ प्रचारक श्री गुरुदेव सेवामंडळ यांचे मार्गदर्शनात डॉ . सुभाष सावरकर आणि ज्ञानेश्वर दुर्गादासजी रक्षक यांनी एम . ए . राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासक्रमांचे सिलॅबस तयार केले होते . पण विद्यापीठाने त्याची दखल घेतली नाही . विद्यापीठ नामकरणानंतर प्रयत्न सुरूच होते . | डॉ . विलास सपकाळ कुलगुरू झाल्यानंतर त्यांचे आदेशाने एम . ए . राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासक्रम २०१३ मध्ये तयार होऊन सुरू करण्याची घोषणा विद्यापीठात झाली . या विचारधारेचे तात्पुरते प्रमुखपद डॉ . अक्षयकुमार काळे यांचेकडे आले . त्यांचे प्रयत्न फार तोकडे पडले . ते सुद्धा या अभ्यासक्रमापेक्षा सर्टिफिकेट कोर्स व्हावा या मताचे होते . माझ्याशी अनेकदा त्यांनी यावर चर्चा केली . विद्यार्थी एम . ए . राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारेला भेटणार नाही असा त्यांचा समज होता . । पण २०१५ ला सध्याचे कुलगुरू डॉ . सिद्धार्थ विनायक काणे सरांनी अभ्यासक्रमाविषयीचा घोळ समजून घेऊन तज्ञ अभ्यासकांशी चर्चा केली . २०१५ मध्ये पहिल्याच वर्षी एम . ए . राष्ट्रसंत तुकडोजी अभ्यासक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त विद्याथ्यांनी प्रवेश घेतला . विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून कुलगुरू डॉ . काणे सरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुज आश्रम येथील पुण्यस्मृती महोत्सवात लाखौ जनसमुदायासमोर या अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली . तीच घोषणा नंतर नागपुरातील प्रसिद्धी माध्यमातून केली . पण या कुलगुरूंच्या आव्हानाला व्यवस्थापन परिषदेत विरोध करण्यात आला होता . कारण इतर विचारधारांना पण हाच नियम लागू करावा लागेल , अशी भीती त्यांनी दाखवली . पण विद्यापीठात महात्मा गांधी विचारधारा आणि डॉ . आंबेडकर विचारधारा यु . जी . सी . च्या अनुदानावर चालतात . विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी या महामानवाचे नाव आहे . त्यामुळे विशेष बाब म्हणून त्यांचे साहित्य विविध भाषेतून आणि अभ्यासक्रमातून लोकांपर्यंत जावे ही कुलगुरूची आणि गुरूदेव सेवकांची राष्ट्रसंतांच्या साहित्याच्या अभ्यासकांची इच्छा होती . पण ते समजून सांगण्यास किंवा ते समजण्यास विद्वान कमी पडलेत . । | जर हीच बाब दुस - या कुठल्या महापुरूषांच्याविषयी घडली असती तर जनक्षोभ वाढला असता . विद्यापीठ व्यवस्थापनाने आस्थेचे कारण देऊन ते स्वीकारले असले , राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा याविषयी निश्चित भूमिका विद्यापीठाने जाहीर करावी . संभ्रम करणा - या बातम्या ' तुकडोजी महाराज विचारधारा कोर्सला एकच विद्यार्थी उत्तीर्ण ' दिशाभूल करून अभ्यासकांना विचलीत करणा - या आहेत . बहुजन महापुरूषांच्याच बाबतीत संभ्रम का निर्माण होतो ? अशी चर्चा अभ्यासकांमध्ये सुरू आहे .