उघड्यावर झोपणाऱ्या बेघर निराधारांना दिलानिवारा




  • मनपा समाजकल्याण व पोलिस विभागाचे संयुक्त अभियान

नागपूर,ता. ३० : थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना मनपाच्या बेघरनिवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. महापालिका समाजकल्याण व पोलिसांच्या सामाजिक सुरक्षाविभागाच्या पुढाकाराने अशा बेघरांना पोलिस वाहनांतून बेघर निवाऱ्यापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आलीआहे.

थंडीमुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी महापालिका व पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागातर्फे संयुक्तउपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनापोलिस वाहनांद्वारे बेघर निवारा केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे नागपूर शहरातील रेल्वेउड्डाणपूल, रस्ते, फुटपाथ, हॉटेल, खुले पटांगण, बसस्थानक, रेल्वेस्थानक या ठिकाणी यापुढे बेघरांना उघड्यावरराहण्याची गरज पडणार नाही. निवारागृहात् पाणी, स्वच्छतागृह, गादी, चादर, ब्लँकेट आदी मूलभूत सुविधाउपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘बेघर फ्री सिटी’ अभियानाच्या यशस्वीतेकरीता मनपा अप्पर आयुक्तअझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनातपोलिस निरीक्षक श्रीमती संखे, प्रमोद खोब्रागड़े, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांचेसह सामाजिक सुरक्षा पोलिसविभाग, मनपा समाज कल्याण विभाग तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी कार्य करीत आहेत.