जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची कारंजा येथे भेट

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

  कारंजा शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सहभाग घेतला असून कारंजा शहरातील नागरिक या अभियानाला चांगला प्रतिसाद देत असून अधिकारी लोकप्रतिनिधी सुद्धा शहर स्वच्छ करण्यात समोर आले आहे . बुधवार दि. ९/०१/२०१९  ला सकाळी  वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी नगर पंचायत कारंजा यांनी तयार केलेला घनकचरा व्यवस्थापन व कंपोस्ट खत युनिट ला भेट यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांना घन कचरा व्यवस्थापन व कम्पोस्ट खत युनिट ची  कारंजा नगरपंचायत च्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी माहिती दिली. 

व जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण युनिटची पाहणी केली. यावेळी सनसाईन स्कूल आणि गरुकुल पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेवर मार्गदर्शन केले. काही ठिकाणी त्यांनी काही उपाययोजना दिल्या कारंजा नगर पंचायतला प्रत्येक प्रभागात स्वच्छतागृही गट तयार करून स्वच्छता चळवळ राबविण्याचे  जिल्हाधिकारी यांनी सुचविले. सोबत त्यांनी या व्यवस्थापन उपक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन पाहून समाधान व्यक्त केले. 

आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्व संस्थांच्या उत्सुर्फ प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी तहसील कार्यालय येथे  कारंजा नगर पंचायत च्या वतीने उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन कुमावत, मुख्याधिकारी , पल्लवी राऊत , नगराध्यक्षा कल्पना मस्के, नगर उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, सह नगरसेवक  प्रेम महिले , सतीश इंगळे, मंगला जीवरकर, भगवान बुवाडे, विनोद जीवरकर सह नगरपंचायत कर्मचारी हजर होते.सध्या कारंजा नगर पंचायत यांनी स्वच्छतेचा विडा उचलून कारंजा शहर कचरा मुक्त करण्यासाठी सर्व प्रयन्त करत आहे. दररोज स्वच्छत्ता मोहीम राबविण्यात येत आहे.