बाबूपेठ येथे उष्माघाताचा बळी
चंद्रपूर जिल्हा हा देशात तापमानात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून नावलौकिक आहे . आज बाबूपेठ येथील एका बारावीत शिकणाऱ्या मुलाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने याचा प्रत्यय आला आहे . चंद्रपूर येथील सिद्धार्थ, नगर बायपास रोड, बाबूपेठ येथील रहिवासी असलेला सुरज ऋषी वेलेकर वय 18 हा मुलगा आज उष्माघाताने मृत्यू पावलेला आहे .