जिल्हात आज अचानक वाढली कोरोना बाधितांची संख्या, प्रशासनाचा नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन!





जिल्हात आज अचानक वाढली कोरोना बाधितांची संख्या, प्रशासनाचा नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन!


बुधवारी जिल्ह्यात 31 बाधित तर 1 मृत्यु*

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 60
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 31 जण नव्याने बाधित आले आहेत. तर बुधवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 24, बल्लारपूर 2, राजुरा 2, चंद्रपूर 1,भद्रावती 1 तर चिमूर येथे 1 रुग्ण आढळून आले असून ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील एका महिलेचा समावेश आहे.
जिल्हात आज अचानक वाढली कोरोना बाधितांची संख्या, प्रशासनाचा नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन!
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 944 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 339 झाली आहे. सध्या 60 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 3 हजार 406 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 13 हजार 50 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

*प्रशासनाचे आवाहन :* नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

दिनचर्या न्युज