सिटीपीएसमध्ये वनविभागाच्या हलगर्जीपणाचा अखेर भोजराज ठरला बळी!







सिटीपीएसमध्ये वनविभागाच्या हलगर्जीपणाचा अखेर भोजराज ठरला बळी!

अनेक दिवसांपासून या परिसरात आहे वाघांचे बस्तान!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देश्याच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विज निर्मिती केंद्रात काल रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने कामावरून परत घराकडे जात असलेल्या एका मजुरांवर हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
भोजराज मेश्राम वय 59असे ते वैद्यनगर तुकुम येथील घटना आहे. सिटीपीएस मधील कुणाल कंपनीत काम करीत होते. युनिट क्र 8व 9 मधील बेल्टचा काम करीत असल्याची माहिती आहे. काल रात्री आपले काम करून घराकडे जात असतांना आत मधील रस्त्यावरच दबा धरून वाघाने हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचे शव बाहेर काढण्यात आले.
अनेक दिवसांपासून या परिसरात वाघांचे बस्तान बसविले आहे. तिन चार दिवसा अगोदर राष्ट्रवादी नगरच्या सिटीपीएस जाणाऱ्या गेटवर फिरणाऱ्या वाघाचा विडीओ आला होता.

सिटीपीएसचा व वनविभागाच्या गलथान कारभाराचा मजुर ठरला बळी!

सिटीपीएसमध्ये आतमध्ये जाण्यासाठी कुणालाही परवानगी नाही. आत मध्ये जाण्यासाठी सिआयएसएफची मंजूरी घ्यावे
व इतर राजकारण्यांना आत जाण्यासाठी राजरोसपणे सुट दिल्या जाते. वाघांचे आत मध्ये अनेकदा वावर असल्याचे दिसून आले आहे. मात्र वनविभाग व सिटीपिएसचे अधिकारी मुग गिळून गप्प बसले आहेत. सिटीपीएस मध्ये इतक्या घटना घडत असताना सुध्दा अधिकारी झोपेचे सोंग घेऊन आहेत. त्याच्या या हलगर्जीपणामुळेच या मजुरांचा बळी गेला आहे.

वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी अनेकांनी दिले निवेदन !

सिटीपिएस मध्ये धुमाकूळ घातलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी मंत्र्यांना निवेदने दिली मात्र वनविभागाला वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी वेळच मिळेना अशी गत निर्माण झाले झालेली आहे. शिवसेनेचे कैलास तेलतुंबडे, अमोल मेश्राम तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे या बाबत वनविभागाला निवेदन दिले होते. मंत्रालयात जाऊन मंत्र्यांना बंदोबस्त करण्यासाठी मागणी  केली आहे. मात्र वनविभागाच्या डोळ्यावरची पट्टी अजूनही निघालेली दिसत नाही.मात्र अखेर वाघाने भोजराजला निवाला बनवले.