जो कि चांदा नावाने ओळखला जात होता ते नाव लोकपुर च्या जागेवर घेण्यात आले होते ते नाव प्रथमता इंद्पूर चे बदलले होते ते कालांतराने चंद्रपूर झाले. ब्रिटीश कालावधीत चांदा जिल्हा म्हणून संबोधले जात होते जे कि बदलवून त्याचे मूळ नाव चंद्रपूर १९६४ चे आसपास करण्यात आले. प्रदेशात इतर स्थळे प्राचीन वेळी वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्खंडा यांचा समावेश आहे. हिंदू आणि बुद्धिस्ट राज्यान्ही क्षेत्रावर बराच काळ राज्य केले. त्या नंतर गोंडराजांनी ९ व्या शतकाचे सुमारास १७५१ नंतर मराठी काळाचे सुरुवातीस राज्य केले अखेरचा राजवंशी राजा राघुशी भोसले याचा मृतू १८५३ मध्ये झाला. नागपूर आणि चंद्रपूर एकत्र ब्रिटीश साम्राज्य म्हणून घोषित केले.
१८५४ मध्ये, चंद्रपूर स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. आणि १८७४ मध्ये ती तीन तहसिली उदा मुल , वरोरा आणि ब्रम्हपुरी समाविष्टीत करण्यात आले. १८७४ , तथापि, मद्रास वरच्या गोडवाई जिल्हा कमी करून आणि चार तहसिली चंद्रपूर मध्ये जोडण्यात आले. मुख्यालय म्हणून सिरोंचा एक तहसील ठेवण्यात आली. १९८५ मध्ये एका तहसील मुख्यालयाचे मुल वरून चंद्रपूर हस्तांतरण करण्यात आले १९०५ मध्ये नवीन तहसील मुख्यालयासह गडचिरोली येथे ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर तहसील पासून जमीनदारी मालमत्ते सह हस्तांतरित करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनदारी चा लहान हिस्सा नव्याने अस्तित्वात आलेल्या जिल्ह्यास १९०७ मध्ये हस्तांतरित करण्यात आला. त्याच वर्षी क्षेत्र १५६० चौ कि. मी. तिन्ही विभागाचे नावे चरेला, अल्बक आणि नुगीर मद्रास राज्यात हस्तांतरित करण्यात आले होते.
कोणतेही जास्त बदल न करता १९११-१९५५ दरम्यान जिल्हा किंवा त्याच्या तहसिली सीमे मध्ये आल्या. १९५६ मध्ये राज्य पुन्हसंयोजना योजनेचा परिणाम म्हणुन जिल्हा मध्यप्रदेश राज्यातून बॉम्बे राज्यास हस्तातरीत करण्यात आला त्याच कालावधीत हैद्राबाद राज्याचा आदिलाबाद जिल्ह्याचा भाग राजूरा तहसील नांदेड जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्यात १९५९ मध्ये हस्तांतरीत करण्यात आले. मे १९६० महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासून जिल्हा त्याचा भाग झाला. प्रशाकीय सोईसाठी आणि औद्योगिक व शेती विकासा करिता १९८१ जणगणने नंतर जिल्ह्याची विभागणी चंद्रपूर आणि गडचिरोली अशी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात आता असलेल्या तहसिली चंद्रपूर, मुल, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, गोंडपिपरी, पोम्भूर्णा, राजुरा, कोरपना, बल्लारशा आणी जिवती यांचा समावेश आहे.
दृष्टीक्षेपात जिल्हा
विवरण | संख्या |
मुख्यालय | चंद्रपूर |
क्षेत्र | 11,443 चौरस किमी |
लोकसंख्या | 2194262 |
लोकसंख्या घनता | 155 प्रति चौरस किमी |
साक्षरता प्रमाण | 59.41% |
तालुक्यांची संख्या | 15 |
उपविभागांची संख्या | 8 |
महानगर/नगर पालिका | 7 |
गावांची संख्या | 1836 |
लोकसभा मतदारसंघ | 2 |
विधानसभा मतदारसंघ | 6 |
ग्राम पंचायत | 847 |
जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती
विवरण | संख्या |
उत्तर अक्षांश | 18-4 to 20-5 (19.57’ ) |
पूर्व अक्षांश | 78-5 to 80-6 ( 79.18’ ) |
समुद्रसपाटीपासूनची उंची | 189 |
क्षेत्रफळ
विवरण | संख्या |
एकूण भौगोलिक क्षेत्र | 11,443 चौरस किमी |
लोकसंख्या क्षेत्र | 880 चौरस किमी |
कृषी क्षेत्र | 4870 चौरस किमी |
औद्योगिक क्षेत्र | 32.34 चौरस किमी |
वन क्षेत्र | 3810 चौरस किमी |
पड जमीन | 550 चौरस किमी |
चंद्रपूर जिल्ह्यातील बोलीभाषा
चंद्रपूर मधील बहुतांश लोकांकडून मराठी बोलली जाते. चंद्रपूरमध्ये बहुतेक गोंड लोक गोंडी भाषा बोलतात. काही लोक हिंदीमध्ये देखील अस्खलित आहेत. लोकसंख्येचा मोठा विभाग इंग्रजी देखील बोलतो.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी साहित्यावरील परिषदेचे आयोजन 1979 मध्ये (अध्यक्ष वामनकृष्ण चोरघडे) आणि 2012 मध्ये (अध्यक्ष वसंत आबाजी डहाके) दोनदा चंद्रपूर येथे झाले होते.