आ.विजयराव भांबळे अभिष्टचिंतन सोहळा निमित्त रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भूमिपूजन

परभणी/प्रतिनिधी:

आ विजयराव भांबळे साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त आयोजित ह भ प श्री रामरावजी ढोक महाराज नागपूर यांच्या सुश्राव्य वाणीतून रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या मंडपाचे भूमीपूजन आयोजक श्री विश्वनाथजी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा जि प मैदान जिंतूर येथे होणार असून दि 13 डिसेंबर पासून दि 19 डिसेंबर पर्यंत रोज सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच दि 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ह भ प ढोक महाराज यांचे काल्याचे कीर्तन व त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी कथा श्रावनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक जि प अध्यक्ष उज्वलाताई राठोड यांनी केले आहे.
भूमिपूजन वेळी उपस्थित प्रमोदभाऊ भांबळे, प्रसादराव बुधवंत, मनोज थिटे, बाळासाहेब भांबळे,रामराव उबाळे,अविनाश काळे, अभिनय राऊत, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, शरदराव अंभोरे, विजय खिस्ते,श्यामराव मते , बालाजी जाधव, शाहिद बेग मिर्झा, इस्माईल शेख, शोएब जनिमिया, अहेमद बागवान, दलमीर पठाण, गणेश इलग, मुजाभाऊ तळेकर, सुभाष घोलप, प्रकाश शेवाळे, विनोद राठोड, विजय वाकळे,सचिन बोबडे, संजय (पिनू )काळे, पप्पू मते ,संदीप राठोड, कृष्णा राऊत, सचिन स्वामी, किरण दाभाडे, चंद्रशेखर घुगे गजानन कांगणे, गंगाधर तरटे, दत्तराव लाटकर, शंकर गंजे, बबन मगर, सुरेश राऊत, पप्पू देशमुख, पिंटू डोंबे, जगदीश शेंद्रे, रंगनाथ काळदाते,अनिल झटे, आदी उपस्थित होते.