राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

 विष्णू तळपाडे(अकोले-अहमदनगर):

बदलापुर येथील कोळी महादेव समाज संघटना,आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य,वधुवर परिचय मेळावा,गोतेभाऊ स्नेह संमेलन,आदिवासी संस्कृती मेळावा आणि आदिवासी संस्कृती सन्मान सोहळा पार पडला.यावेळी अकोले तालुक्यातील बीजमाता राहिबाई पोपेरे यांना कृषीरत्न पुरस्कार व निसर्गवासी किसन इष्टे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाऊसाहेब पारधी व सुरेश बांडे यांनी केले.अध्यक्ष स्थानी प्रकाश धिगे हे होते.या वेळी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त शंकर अस्वले GSTचे सहाय्य आयुक्त मुरलीधर बांडे नगरसेवक संदिप लोटे,धर्मा लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.मंडळाची भूमिका व कार्य शिवाजी सुरकुले यांनी सांगितले.प्रस्तावीक भारती उडे यांनी केले,तसेच सूञसंचालन सुधीर साबळे यांनी केले तर आभार किसन भारमल यांनी मानले.