रागाच्या भरात माणसाने कोणतेही काम करू नये: मुरलीधरजी महाराज

चंद्रपूर/प्रतिनिधी:

रागाच्या भरात माणसाने कोणतेही काम करू नये .एकदा रागाच्या भरात माणसाचा मनावरचा संयम सुटला तर त्यामुळे खूप दुष्परिणाम भोगावे लागतात. क्रोध जेव्हा येतो माणसाला त्यावेळेस शांत राहून काम केल्यास ते काम यशस्वी होऊ शकते. क्रोधात केलेले काम कधीही यशस्वी होत नाही. असे प्रतिपादन श्री राम कथा वाचक मुरलीधर जी महाराज यांनी चांदा क्लब येथे आयोजित श्री रामकथा महोत्सवाच्या सातव्या दिवशी केले.

पूज्य मुरलीधर जी महाराज यांच्या हस्ते महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, निर्दोष बाबू पुगलिया विश्व हिंदू परिषदचे रमेशजी बागला, सचिन तिवारी,ललित व्यास,अनुप काबरा, यांचा सन्मान करण्यात आला.