मनुष्याचे भविष्य त्याच्या कर्मावर अवलंबून आहे:मुरलीधरजी महाराज

चंद्रपूर/प्रतिनिधी:

हातातील अंगठीच्या खड्यावर अवलंबून न राहता आपल्या हाताने केलेल्या कर्माच्या भरोवश्यावर मनुष्य आपले  भविष्य बदलू शकते.मनुष्याचे भाग्य त्याच्या कर्मावर अवलंबुन आहे. पण काही लोक त्यास रंगीत खड्यात शोधतात.राम कथेच्या पाचव्या दिवसाच्या प्रवचन पुष्प गुंफतांना पूज्य मुरलीधरजी महाराजांनी सांगितले.
रामकथेच्या पाचव्या दिवशी सत्यनारायण तिवारी परीवार तर्फे श्री राम चरित्र मानस ग्रंथाचे पुजन कऱण्यात आले
श्री मुरलीधर जी महाराज पुढे म्हणाले की, या जगात भजन करणे जरुरी आहे,भजना द्वारे वैराग्य मिळवता येते.या प्रसंगी CA दामोदर सारडा,मधुसूदन रुंगठा, रमेश मुंदडा, विनोद उपाध्याय, सुरेश शर्मा,जुगलकिशोर राठी, काजु जोशी,गोपिकीशन पोद्दार, नितीन सोमाणी, सुभाष जैन,इंदर बियाणी, यांचा महाराजांनी सम्मान केला.
रामकथेच्या यशस्वीतेसाठी वेगवेगळ्या समितीचे गठन करण्यात आले आहे,अशी माहिती सुरेश राठी यांनीं दिली.

आज सामुहिक सुंदर कांड पठण
चांदा क्लब ग्राउंड वर स्थापीत अयोध्या धाम येथे गुरुवारी रात्री 9 वाजता सामुहिक सुंदर कांड पठण चे आयोजन करण्यात आले आहे. श्री राम चरित्र मानस प्रेमी तर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.