घातक ग्रुपतर्फे भव्य अन्नदान व पाणीवाटप

परभणी/ प्रतिनिधी:

डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणाऱ्या 500 भिमसैनिक, समाजबांधव व माता-भगिनींना येथील घातक ग्रुपच्या वतीने दि.5 डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन येथे भव्य अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी आयोजक घातक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पै.सुदर्शन (भैय्या) बनसोडे, अध्यक्ष मुकेश (दादा) अवचार यांच्यासह सुरेश चांदणे, रंगीत बनसोडे, शेखर सवंडकर, संदीप खुणे, बाळू बोबडे, गजानन शिंदे, बळीराम जोगदंड, सतीश उफाडे, प्रकाश वाळवंटे, अमोल जगाले, माधव रायमले, भैय्या सुगंधे, शिवराज घाटगे , विष्णु वालेकर , शुभम सावंत, शशिकांत टिकूळे, प्रदूमन चांदणे, महेश बनसोडे, सागर चव्हाण, बाळू खुणे, मारोती गिराम, रामा कुरे, ज्ञानेश्वर वाळवंटे, सुशांत खाडे आदींसह मोठया संख्येने अनेकांची उपस्थिती होती.