कडाक्याच्या थंडीच्या लाटेत शेतपीके करपली

कारंजा - काटोल तालुक्याचे शेतकरी पुन्हा हवालदिल
उमेश तिवारी/कारंजा वर्धा:
 राज्याच्या उपराजधानी सह उपराजधानीच्या लगतच्या वर्धा जिल्हा व नागपुर जिल्ह्यातील काटोल -तालुक्याच्या  सालई-नांदोरा खुर्सापार,सबकूंड, वाई -चिखली-कचारी सावंगा,बोरगाव,कोंढाळी,तरोडा;  सह लगतच्या वर्धा जिल्ह्याचे काजळी-जोगा हेटी;धानोली,मेट गरमसुर  या परिसरातील शेतीतील पीकांन वर २८,२९,३०डिसेंम्बर  चे रात्रीला पडलेल्या थंडिच्या कडाक्यात   शेतातिल मुख्यत्वे  करून तूर  -यापिकासह-मिरची--चना-कपाशी-व हळद  पीकांन वर करपा गेल्याने उभे पीक  शेतकर्यांचे हातून गेल्यात जमा आहे. खरीप आधीत हातून गेले,ज्या शेतकर्यांकडे थोडे फार पाण्याचे साधन होते या मुळे  काही पीक तूर हळद मिरची  कपाशी  तर  भाजिपाला बागयती   ०५-१%शेतकर्यांकडे होत्या त्या ही २८-व-२९डिसेंम्बर चे रात्रीच्या कडाक्याच्या थंडी च्या लाटेच्या प्रभावाखाली आल्याने या सर्व पीकांन वर करपा गेल्या मुळे संपुर्ण नागपुर व वर्धा जिल्ह्यालाच  पुर्ण दुष्काळग्रस्त जिल्हे घोषीत करन्याची मागणी कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे व उप सरपंच स्वप्निल व्यास व त्यांचे  सर्व ग्रा. प. सहकार्यांनी  केली आहे.तसेच काजळी चे शेतकरी साहेबराव घागरे यांनी मागणी केली आहे.