पंधरा दिवसांसाठी 'या' बारला केले सील ! नियमाला बसवले होते धाब्यावर !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील अगदी मध्यभागी असलेल्या (वाघाडे) आदित्य वाईन बारला काल सायंकाळी जवळपास पाच सहा च्या सुमारास राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाने कारवाई करीत सील केले.
चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आल्या नंतर मोठ्या प्रमाणात दारु परवाणे वाटप करण्यात आले आहे. मात्र हे परवाणे वाटप करत असतांना काही ठिकाणी शासन नियमांचे उलंघन झाले आहे. या बारला पार्किंग नाही, किचन, शौचालयाची व्यवस्था सुद्धा नसल्याने आणि या बारमध्ये अगदी नळाची व्यवस्था करून ग्राहकांना तिथेच पिण्याची व्यवस्था करून दिली गेली होती. सर्रास वाईन शाप च्या दरात दारूची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या संदर्भाची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर पथकाने कारवाई केली. आदित्य वाईन बार पंधरा दिवसांसाठी सील करण्यात आले असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली.
दारुबंदी झाली तेव्हा 350 परवाणे चंद्रपूर जिल्हात होते. दारुबंदी उठल्या नंतर अडिच तीन वर्षात 733 परवाण्यांना परवाणगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी 75 मीटर पर्यंत शाळा नसावी, धार्मीक स्थळ नसावे अशा इतर अटी असतांना सुध्दा याकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात नवे परवाणे देण्यात आले आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील अनेक वाईन बार मालक व्यवसाय करीत आहेत. आदित्य वाईन बारवर कारवाई झाल्याने चंद्रपूर शहरातील अनेक बार मालकांचे धाबे दणाणले आहेत.