चार दिवसात सहा महिला वाघाच्या हल्ल्यात ठार, मानवी चूक की वन विभागाचा दुर्लक्षितपणा !


चार दिवसात सहा महिला वाघाच्या हल्ल्यात ठार, मानवी चूक की वन विभागाचा दुर्लक्षितपणा !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम जंगल परिसरात सुरू आहे. सकाळच्या सुमारास तेंदू पान संकलन करण्याकरिता जंगल लगतच्या गावातील नागरिक जंगलात जात असतात. मात्र मागील काही दिवसापासून सतत चार दिवसात सहा महिलांना वाघाच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. या घटनेने चंद्रपूर जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे. एवढेच नाही तर मागील चार महिन्यात जिल्ह्यात जवळपास 20 लोकांचा बळी गेला आहे. जिल्हात मानव - वन्यजीव संघर्षात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यासाठी मानवी चूक की वन विभागाच्या दुर्लक्षितपणाचा हा कळस समजायचा का? एकीकडे वनालगतच्या नागरिकांना वर्षभराच्या रोजगाराची संधी तेंदूपत्ता संकलनातून मिळत असते. तर दुसरीकडे वन विभागाचे निर्देश असताना जंगलात मानवाचे प्रवेश करणे त्यातील वन विभागाचे निर्देश न पाळणे यात दोष कोणाचा? वनालगतच्या गावातील जनतेला आपला जीव मुठीत घेऊन जंगल लगतच्या गावात राहावं लागते. त्यासाठी वर्षभर रोजगार पोटापाण्याचा प्रश्नही भेडसावत असतो. यासाठी त्यांना जंगलात जाऊन तेंदू पत्ता संकलन करण्यास जावं लागते. वन विभागच तेंदूपत्ता संकलन करण्याची परवानगी देत असताना जंगली श्वापदापासून संरक्षणाची जबाबदारी स्वीकारत नसल्याने नाहक बळी गेले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या कार्य क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
वन विभागाने जंगलवाप्त परिसरातील नागरिकांनी जंगलात जाताना समूहासोबत जावे. तेंदू पत्ता जास्त संकलन करण्याच्या लालचे ने सकाळीच जंगलव्याप्त परिसरात जाऊ नये. जायचे झाल्यास सकाळी आठ ते नऊ च्या नंतर जंगलात समूहासह जावे. जंगलव्याप्त गावातील नागरिकांना गस्त घालण्यासाठी पाच ते सहा लोकांचा गट निर्माण करण्यात आला आहे. त्या गटातील दोन ते तिन लोकांजवळ स्टेन गन उपलब्ध असते. त्या स्टेनगन चा आवाज जवळपास 100 मीटर पेक्षा जास्त दूर जात असतो. त्यामुळे हिस्त्र पशु जवळपास येत नसतात. अशा सूचनाही वन विभागाकडून देण्यात आले आहेत.
सुरक्षा साठी वन्यजीव व मानवी संघर्ष यासाठी श्वापदाना दुसरीकडे वळवण्यात येतील का? जंगलव्याप्त गावांना जाळीचे कुंपण करता येईल का? वाघांना कॉल आयडी लावणे शक्य आहे का? ए आय द्वारे उपायोजना करता येईल का? वनपरिक्षेत्रात ड्राफ्टिंग कॅमेरे लावले ड्रोन कॅमेरा द्वारे पाळत ठेवणे. अशा उपाय योजना करण्यासाठी राज्यस्तरावर वन विभागाकडून निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी वन विभागाकडून उपायोजना म्हणून मास्क उपयोग म्हणून करण्यात आला होता. तो उपाय सुद्धा निष्क्रिय झालाचे दिसून येत आहे.
जंगलालगत मानव, पाळीव प्राण्यांवर वाघ, बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
गावालगतच्या जंगलांना अनेक शेती लागून आहेत.
त्यामुळे शेतीवर कामे करताना शेतकरी व शेतात काम करणारे मजूर यांचेवर वाघांचे हल्ले होत असतात. जिल्ह्यात वाघांना पोषक वातावरण असल्याने वाघाच्या संख्खेत लक्षणीय वाढ झाली आहे. वाघ शिकारीसाठी गावालगतच्या जंगलात येत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी वन विभाग सस्पेल फेल झाल्याचे दिसून येत आहे.
विविध योजनाकरण्याचे वन विभागाकडून निर्देश दिल्या जात असले तरी जिल्ह्यात मानव- वन जीव संघर्ष थांबता थांबेना. आता ही वेळ आल्याने मानवी चूक की वन विभागाच्या कार्यसंमतेच्या निष्काळजीपणावर  प्रश्नचिन्ह निर्माण  झाले आहे.